Breaking

Monday, 17 May 2021

टेंभूर्णी प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- जगताप यांच्या मागणीला यश.


*श्री.जगताप यांच्या मागणीला यश*
करमाळा÷ मातंग एकता आंदोलन करमाळा शहर अध्यक्ष युवराज भाऊ जगताप यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दि. 8 मे 2021 रोजी ई मेल व्दारे लाॅकडाऊनमुळे गोरगरीब कामगार वर्गावर व बहुजन समाज्यावर उपासमारीची वेळ आली म्हणून मोफत रेशन अन्नधान्य द्या अशी मागणी युवराज भाऊ जगताप यांनी केली होती. त्या मागणीला यश आले असून दि.17 मे 2021 रोजी पासून मोफत अन्नधान्य वाटप चालू केले आहे. मोफत रेशन अन्नधान्य वाटप केल्याने गोरगरीब कामगार वर्ग व बहुजन समाजाची तूर्तास चांगली सोय झाली आहे.श्री युवराज भाऊ जगताप यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment