Breaking

Saturday, 31 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंदीरे उघडण्याबाबत राज्य सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंदीरे उघडण्याबाबत राज्य सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या महिनाभरापासून राज्य सरकारने हळूहळू नियम शिथील करत बाजारपेठ, हॉटेल, बार आदी सुरू केले आहे. मात्र, अद्याप मंदिरे उघडलेली नाही. विशेष म्हणजे, आषाढी वारीवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने वारकरी संप्रदायाने सामंजस्याची भूमिका घेतली. पण आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिकी एकादशी आणि आळंदी कार्तिकी एकादशी संदर्भात शासनाने धोरण निश्चित केले नसल्याने वारकरी संप्रदायामध्ये नाराजी आहे. आज श्री ज्ञानेश्वर 






महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाचे भाऊ महाराज फुरसुंगीकर आणि भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन सरकारच्या धोरणाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच, सरकारने याची दखल घेतली नाही, तर याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटतील अशी भावना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment