*बड्या बापाच्या अवलादीने आज माजलगावात एक कुटुंब उध्वस्त केलं* ह्या औलादीनी आपला माज दारू पिऊन जिरवताना माजलगाव परभणी रस्त्यावर तुफान वेगाने गाडी चालवत एका हसऱ्या खेळत्या कुटुंबाचं भविष्य अंधाराच्या खाईत लोटलं. एक बाप आपला 17 आणि 12 वर्षाचा मुलाला घेऊन रोशनपुरी या आपल्या गावी निघाला होता. विशेष म्हणजे कधीही वडिलांच्या दुचाकीवर बसून गावाकडे न जाणारा त्यांचा 17 वर्षाचा मोठा मुलगा गणेश हा आज त्यांच्यासोबतच गावाकडे निघाला होता. इकडे बापाच्या पैशाच्या जीवावर 'रुबाब' हाणणारी काही गिधाडं दारू पिऊन तरर झाली होती. जणू ही गिधाडं तिघे बाप लेक येण्याचीच वाट पहात होते. त्यांची गाडी समोर येताच या गांजा खस औलादीने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात वसंत डांगे (वय 50), अविनाश वसंत डांगे (वय 13) हे जायबंदी झाले आहेत. तर गणेश वसंत डांगे (वय 17) ह्या मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो उपचारा दरम्यान मयत झाला. वसंत डांगे यांना तत्काळ अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलवण्याची सूचना येथील डॉक्टरांनी केली. त्यानुसार त्यांना लातूरच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत आहे. तर अविनाश याच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत.
ही घटना इथेच संपत नाही. वसंत डांगे हे भविष्यात कितपत चालू शकतील याबद्दल शंकाच आहे. आधीच त्यांच्यावर त्यांच्या वृद्ध आईची नियमित शुश्रूषा करण्याची जबाबदारी होती. एक मुलगा तर ह्या गिधाडांनी ठार केलाच पण वसंत डांगे यांना ह्या पिदाड्यानी जायबंदी केलंय. दुसरा मुलगा अविनाश देखील जायबंदी झालाय. आता वसंत डांगे यांच्यावर तातडीने एका निष्णात प्लास्टिक सर्जनच्या देखरेखीखाली उपचार करणे गरजेचे आहे. मात्र एकही प्लास्टिक सर्जन इतक्या रात्री उठून सेवा द्यायला तयार नाही. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता बड्या बापाच्या पैदाशीनी हा अक्सिडेंट केला होता. आता शुक्रवारी पहाटेचे 6 वाजलेत तरीही आमचा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा संघर्ष संपलेला नाही. ह्या बड्या बापाच्या पैदाशीची नशा आता उतरली असेल तर पोलिसांनी ह्या हरामीना सापडून ह्यांच्या गांडीचे साल्टे निघोस्तोवर मार द्यायला हवाय. आमच्या पेशंटच्या रात्रभर कानी पडणाऱ्या किंकाळ्या ऐकून जीव कासावीस झालाय. बड्या बापाच्या ह्या भाडखाऊ पैदाशीच्या किंकाळ्या आता कानी पडाव्यात. दोन दिवसांपूर्वी परळीत देखील बड्या बापाच्या औलादीकडून अशीच घटना घडली होती. शुक्रवारीच बीडमध्ये बार्शी नाका भागात देखील अशीच घटना घडली. आता माजलगावातही अशीच घटना घडली आहे. बड्या बापाच्या औलादीचा पैशाचा माज जोपर्यंत उतरवून ठेवला जात नाही तो पर्यंत गरिबांचे जीव असेच चिरडून चिरडून मारले जाणार. पोलिसांमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर त्यांनी ह्या हरामी औलादीना सोडू नये... ह्यांचा 'रुबाब' जिथल्या तिथेच ठेचून काढावा...


No comments:
Post a Comment