Breaking

Tuesday, 19 October 2021

करमाळा तालुका प्रतिनिधी/ संदीप शिंदे- करमाळा तालुक्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गाव तिथे जनशक्ती संघटनेची शाखा स्थापन करणार...अतुल खुपसे पाटील.


करमाळा तालुक्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी गाव तिथे जनशक्ती शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करणार अतुलभाऊ खुपसे-पाटील 
करमाळा दि.19 (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. या भागातील शेतकरी आजही पाण्यापासून वंचित आहे. या भागाला पाणी मिळून देण्यासाठी व पाण्यासह वीज, रस्ते, व अन्य समस्या सोडविण्यासाठी आपण जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र लढा उभा करणार आहोत असे स्पष्ट मत जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुलभाऊ खुपसे-पाटील यांनी व्यक्त् केले. 
करमाळा तालुक्यातील मौजे पिंपळवाडी येथे आयोजित जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब चव्हाण युवा जिल्हा अद्याक्ष ) जनशक्ति शेतकरी संघटना शरद काळे. लक्ष्मन सोनवणे.विजय भांडवलकर .रावसाहेब जाधव. संदीप पवार.सुनिल जाधव. निकेल काळे. यशवंत चव्हाण .नाथा कांबळे .सोमनाथ कांबळे. नंदू चव्हाण .दत्ता कांबळे.आदित्य चव्हाण. गजानन चव्हाण .भारत गरड .विशाल काळे वांजरवाडी शाखा प्रमुख किरण बिनवडेपवार वस्ती शाखा प्रमुख श्रीकांत पवार पिंपळवाडी शाखा प्रमुख योगेश चव्हाण माझी सरपंच  अनिल काळे माजी उप सरपंच राहुल कांबळे शरद एकाड राणा महाराज रोहण नाईक हर्षवर्धन पाटील, राम विटकर, दिलीप देशमुख (सावडी)  आदिजण उपस्थितीत होते.
यावेळी या कार्यकर्त्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार खुपसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना अतुलभाऊ खुपसे पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील उत्त्र भागातील मौजे पिंपळवाडी, रोशेवाडी, हिवरवाडी, रावगाव, वंजारवाडी, लिंबेवाडी, राखवाडी, पुनवर, मोरवड, भोसे या गावासह पश्चिम भागातील वीट, अंजनडोह, विहाळ, कोर्टी, सावडी, पोंधवडी, राजुरी, यागावामध्ये शेतीला पाणी मिळत नाही. कुकडीचे पाणी या गावासाठी मृगजळ ठरलेले आहे. कुकडीच्या पाण्यावर राजकर्त्यांनी राजकारण केले. निवडणूकीच्यावेळी मते मिळविण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला. मात्र कुकडीचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना आता पर्यंत पाणी आले आले व पाणी गेले गेले या पध्दतीचे होवून बसले आहे.  खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांनी फसवणूकीचे काम केले आहे. यापुढे मा्र जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांला न्याय मिळवून देण्यासाठी रस्याारवर उतरुन न्याय मिळणे पर्यंत रक्ताचे पाणी करु असे स्पष्ट करुन यापुढे या भागातील रस्ते, वीज, यासह गावठाण जमिनीचे तंटे, महसुल विभागातील प्रश्नसोडविण्यासाठी तीव्र आंदोलन उभा करणार असल्याचेही अतुल खुपसे पाटील यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यामध्ये गाव तिथे जनशक्ती शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करुन या संघटनेच्या माध्यमातून गावातील महसुल, आरोग्य, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, अभिलेख कक्ष, तहसिल, पंचायत समिती, सहकार , खात्याशी निगडीत सर्व कामे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येतील या कामासाठी जनतेने माझ्याशी संपर्क साधावा असे स्ष् ाट करुन जर संघटनेच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळाला नाही  तर गावातील संघटनेचा फलक काढण्याचा हक्क सुध्दा जनतेला राहिल असे त्यांनी स्पष् केले. भविष्यात जनतेच्या कामासाठी तीव्र लढा उभा करणार असल्याचे स्पष्ट मत अतुल खुपसे पाटील यांनी व्यक्त केले. 
शेवटी माजी सरपंच  अनिल काळे यांनी आभार मानले तर मौजे पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने अतुल खुपसे पाटील यांचा भवय सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment